जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । काँग्रेसला नकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आता काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असे काँग्रेसचे म्हणने आहे.
मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. असे काँग्रेसचे म्हणने आहे.
“भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे.असे काँग्रेसचे म्हणने आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले.सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहेत असा दावा काँग्रेसने केला आहे.