जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । टाकरखेडा ( ता.यावल ) येथील शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या भुरट्या चोरट्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यावल पोलिसांना निवेदन दिले.

रविवारी येथील पोलिस ठाण्यात टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यात गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटना होत आहेत. नुकतेच अनेकांच्या शेतातून स्प्रिंकलर, केबल आणी इतर शेती साहित्य चोरी गेले. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय चौधरी, रामचंद्र चौधरी, समाधान चौधरी, विलास चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडे केली.

हे देखील वाचा :
- उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद
- गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
- जळगावात यंदा हाडे गोठवणारी थंडी गायब होणार ; हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याने बळीराजा चिंतेत
- गणेशोत्सवाच्या धामधुमीत जळगाव हादरले; आईसह ५ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू











