अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

मार्च 14, 2021 6:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची कोथळी येथील मानेगाव शिवारात भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला.

raksha khadse panchnama news

raksha khadse panchnama news1

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक असल्याचे मत रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

raksha khadse panchnama news2

खासदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी देवीदास चौधरी, शंकर चौधरी, रामदास चौधरी, पंकज चौधरी, भानुदास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, अमित चौधरी, योगेश चौधरी, योगेश पाटील, मीराबाई पाटील, विजय चौधरी सर, चंद्रकांत चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, अविनाश चौधरी, माधव भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now