⁠ 
सोमवार, मे 20, 2024

चिंता मिटली! गिरणा धरणाने चौथ्यांदा शंभरी गाठली.. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कचा इशारा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. आनंददायी बाब म्हणजे, गिरणा धरण चौथ्यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून रविवारी २२ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता हेमंत पाटील यांनी दिला आहे.

मागील गुरुवारी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. धरण भरल्यामुळे पिलखोड येथील गिरणा नदीला पुराचे स्वरूप आले आहे, तर बहाळ येथील ऋषिपंथा मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुलापलीकडील बहाळ व आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू राहणार आहे.