⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

धक्कादायक : दोघांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । दोघांच्या त्रासाला‎ कंटाळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील‎ लोणजे येथे १८ रोजी घडली. याबाबत दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎अश्विनी राजू चव्हाण असे‎ बालिकेचे नाव आहे. अनुसयाबाई‎ राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या‎ दोन्ही मुली १७ रोजी दुपारी शेतातून‎ घरी येत होत्या. गावातील दिलीप‎ सोनार आणि वासुदेव चव्हाण (रा.‎ पाथरजे) यांनी या मुलींना तुमचे‎ लग्न होवू देणार नाही असे‎ सांगितले. त्यांच्या त्रासाला कंटाळून‎ अश्विनी चव्हाण या बालिकेने १८‎ रोजी दुपारी राहत्या घरी गळफास‎ घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी‎ सोनार व चव्हाण यांच्याविरोधात‎ चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात‎ कलम ३०५, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा‎ दाखल झाला. घटनेनंतर दोन्ही‎ संशयित पसार झाले आहेत. त्यांचा‎ शोध घेत आहेत, लवकरच ते‎ जेरबंद होतील, अशी माहिती तपास‎ अधिकारी पोलिस उपनिरीक्षक‎ लोकेश पवार यांनी दिली.‎