Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

महाराष्ट्रातील ‘या’ ९ जिल्ह्यांत रेड अलर्ट

rain

प्रतीकात्मक फोटो

चेतन पाटीलbyचेतन पाटील
July 21, 2021 | 4:10 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । मागील गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, २३ जुलै या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर व रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

जून महिन्यात सुरुवातीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु त्यानंतर जुलै महिना उजाडला तरी देखील पावसाने राज्यात ओढ दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. संपूर्ण कोकणासह मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील इतर ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावलीय. 

भारतीय हवामान विभागाकडुन 9 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सलग 4 दिवस महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी राज्याच्या अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवू शकते.

राज्यातील 13 तालुक्यात 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. 33 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तर 309 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले आहे.

जळगाव जिल्ह्यातही पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. परंतु मागील दोन दिन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुकवला आहे. काल मंगळवारी देखील जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर आज पहाट पासून पावसाने हजेरी लावली आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in हवामान
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षाखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

मोर्चात नियमांचे उल्लंघन ; ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

crime (1)

जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.