जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि एन.सी.सी. युनिट’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाहतूक सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
जळगाव जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी ए.एस. आय. सैय्यद मुजफ्फर अली (राष्ट्रपती पदक सन्मानित) एन.सी.सी.च्या छात्रसैनिकांसाठी जुना कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
सैय्यद मुजफ्फर अली यांनी वाहतुक करतांना नागरिकांनी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत. भारतात दरवर्षी रस्ता अपघातात किती मृत्यु घडतात. नविन नियम कोणते लागू झाले आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना डॉ. एल.पी. वाघ, विभाग प्रमुख यांनी केली सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार तर आभार एन.सी.सी चे अधिकारी लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी मानलेत.
- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन अंतरंग 2K24 उत्साहात
- बोर्डाच्या 10वी, 12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..
- 16 वर्षांखालील मुलांची शिकवणी होणार बंद ; कोचिंग क्लासेसबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
- MPSC मध्ये दोनवेळा अपयश, पण जिद्द-चिकाटीने धरणगाव तालुक्यातील कन्या बनली अधिकारी
- चौथीच्या वर्गात जावून बसले जळगावचे जिल्हाधिकारी; वाचा काय घडले ?