जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तुर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

लॉकडाऊन ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.

हे नवे निर्बंध लागू शकतात?
-राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल.
-विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
-विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी.
-सोमवार ते शुक्रवारी रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील.
-शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात जमावबंदी
हे देखील वाचा :
- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ ; जाणून घ्या जळगावातील आजचे प्रति तोळा दर
- आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
- जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळेंची बिनविरोध निवड
- जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज?
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!











