⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आता शिवरायांबद्दल भाजप नेत्यांचं वादग्रस्त वक्तव्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता भाजपच्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणखी एक वादग्रस्त विधान केल्याने संताप व्यक्त केला जात.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान केलं. “औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.