पिण्याचे पाणी भरताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

नोव्हेंबर 27, 2021 7:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे ग्रामपंचायतच्या नळाचे पाणी आल्याने पाणी भरण्याकरता पाण्याची इलेक्ट्रिकल मोटर लावण्यासाठी घराच्या ओट्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये कनेक्शन वायर लावत असताना विद्युत शॉक लागल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

images 1 6 jpeg webp

रवंजे बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या रत्‍नाबाई महिपत माळी (वय ४५ वर्ष) शनिवारी ग्रामपंचायतच्या नळाचे पाणी आल्याने पाणी भरण्याकरता इलेक्ट्रिकल मोटर लावण्यासाठी घराच्या ओट्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये कनेक्शन वायर लावत होत्या. अचानक त्यांना शॉक लागल्याने त्या जमिनीवर खाली कोसळल्या. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

याबाबत भास्कर शांताराम माळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now