⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | मनपात १७९ जणांच्या हरकतींवर झाली सुनावणी

मनपात १७९ जणांच्या हरकतींवर झाली सुनावणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेल्या व हरकत घेतलेल्या प्रभाग क्र. १ मधील मालमत्ताधारकांच्या सुनावनीला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवार दि.१२ रोजी २५० नागरिकांनी हरकत नोंदविली होती. त्यापैकी १७९ नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांनी दिली.

महानगरपालिकेककडून करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनात आढळून आलेल्या वाढीव मालमत्ताधारकांना मनपा प्रशासनाकडून विविध वाढीव करांची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी बांधकामात कुठलीही वाढ केलेली नाही किंवा भाडेकरू ठेवलेला नाही तसेच त्यांच्या मालमत्तेत कुठलाही बदल केलेला नाही, मात्र महापालिकेडून वाढीव कराची नोटीस आली असेल तर अशा नागरिकांना नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसाच्या आत हरकत नोंदविता येणार आहे. दरम्यान, मंगळवार दि.१२ रोजी २५० नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यापैकी १७९ नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. उपायुक्त प्रशांत पाटील, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी, उदय पाटील, बाळासाहेब चव्हाण यांनी यांनी हरकतींवर सुनावणी घेतल्याचे प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांनी सांगितले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.