⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | सुर्योदयचा बाल वाङ्: मय पुरस्कार खान्देश कवी विलास मोरे यांना जाहिर

सुर्योदयचा बाल वाङ्: मय पुरस्कार खान्देश कवी विलास मोरे यांना जाहिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

.
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ ।  एरंडोल येथील कवी विलास कांतीलाल मोरे यांना सुर्योदय सर्व समावेशक मंडळाचा बाल वाङ्मयातील सौ . लिलाबाई दलिचंद जैन पुरस्कार जाहिर झाला आहे . सन्मानपत्र आणि रक्कम रु ५००० / = पांच हजार मात्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सुर्योदय अखिल भारतीय साहित्य संमेलनात  जळगाव येथे जाने २०२२ मध्ये या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहिर केले .
अँड विलास मोरे यांना या वर्षीच महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला असून त्यांचे  संगणकाची गाणी , अतड्म ततड्म  शाळेला सुट्टी लागली रे हे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत .  तसेच  शेत शिवार या नावाने त्यांच्या बाल कवितांचे संपादन पुण्याचे पुण्यामत प्रकाशन यांनी केलेले आहे . संगणकाची गाणी या बातकविता संग्रहाची दुसरी आवृती दितीपराज  प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केली असून त्यांची  ‘ तिसरा डोळा ही बालकादंबरी लवकरच  उपलद्ध होणार आहे .  बाल साहित्यातील योगदानाबद्दल  मोरे यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सतीश जैन यांनी जाहिर केले .
औदुंबर साहित्य रासिक मंच अध्यक्ष अँड मोहन बी शुक्ला, माजी अध्यक्ष विजय जाधव , प्रा . वा . ना . आधळे ,  विजय भामरे, निंबा बडगुजर , प्रविण महाजन यांनी विलास मोरे यांचे अभिनंदन केले आहे .

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.