जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. आदर्श नगरातून पत्नीला माहेरी अमरावती येथे सोडायला गेल्यानंतर वैभव मनोहरराव ठोसर (वय ३५) या तरुणाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३० हजारांची रोकड व दागिने असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी उघडीच आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव हे डी-मार्ट येथे नोकरीला आहे. आदर्श नगरात पत्नी दीपिका व मुलगी असे वास्तव्याला आहेत. शुक्रवारी साप्ताहिक सुटी असल्याने वैभव पत्नीला सोडण्यासाठी अमरावती येथे गेले होते. तेथून शनिवारी घरी परत आले असता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तुटलेले होते तर हॉलमध्ये जशाच्या तशा वस्तू होत्या. बेडरूममध्ये कपाट उघडे होते, तर त्यातील साहित्य अस्ताव्यस्त होते. त्याशिवाय कपाटाला लागून असलेल्या ड्रेसिंग टेबलमधील वस्तू देखील अस्ताव्यस्त होत्या.
कपाटात ठेवलेले ३० हजार रुपये रोख २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन भार वजनाचे चांदीचे दागिने, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर वैभव यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा :
- टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार तरुण ठार, आई गंभीर जखमी
- दारूसाठी मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या; जामनेर तालुक्यातील घटना
- यावल येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता ; परिसरात खळबळ
- लाच भोवली ! ग्रामसेवकासह शिपाई जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
- सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या सीआरपीएफ जवानाची आत्महत्या