Tuesday, August 9, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

आमोदासह बामणोद, भालोद उपसा जलसिंचन योजनेचे पुनरुज्जीवन कधी होणार!

jalgaon 1 2
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 11, 2022 | 2:40 pm

तत्कालीन आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांनी मंजूर केला होता निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील आमोदा उपसा जलसिंचन योजना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. संस्थेच्या पंप हाऊस मधील मोटार, पाईप अनेक साहित्य चोरीला गेले आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्कालीन आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांनी आमोदा, भालोद , बामणोद या उपसा योजनांच्या पुनरुज्जीवनसाठी लागणाऱ्या मान्यता व ८० कोटींचा निधी २०१८ साली मंजूर करून आणला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव व कोविड-१९ मध्ये कोरोन मुळे त्यांचे झालेले निधन यानंतर कुणीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपर्यंत या प्रकल्पाची कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाले नाहीत. दरम्यान, या योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू व व्हावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

आमोदा येथील उपसा सिंचन अगदी जुनी झाल्याने व अनेक वस्तू चोरी गेल्या आहेत त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमोदा, बामणोद, भालोद हा पट्टा केळी, ऊस आदी पिकांचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. परंतु, उन्हाळयात जमिनीची पातळी अगदी खाली गेल्यामुळे या पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यातच उपसा योजना असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्व.हरिभाऊ जावळे आमदार असताना त्यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यात आमोदा उपसा योजना (२७ कोटी ३९ लाख) भालोद उपसा योजना (२९ कोटी ५० लाख) व बामणोद उपसा योजनेसाठी (२१ कोटी ६३ लाख) निधींच्या अंदाजपत्रकांना मंजुरी दिली होती. परंतु एवढे असून सुद्धा आज पर्यंत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. जर या उपसा योजनांचे पुनरुज्जीवन लवकरात लवकर झाले तर एकूण २६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे परिसर सुजलाम सुफलाम होईल. मध्यतरी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्ष चेतन चौधरी यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यावेळी त्यांना विभागाकडे मनुष्यबळ नाही अशा प्रकारचे उत्तर मिळाले होते. या योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू व व्हावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in यावल
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

Copy
Next Post
udhav thakre 1

उद्धव ठाकरेंनी लिहिले पत्र आणि शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी

crime muder

खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान महिला कैदीला अटक

mahiti adhikar 1

कायदा माहितीचा अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा..

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group