बोदवड तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी

ऑक्टोबर 5, 2021 2:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Untitled design 2021 10 05T145810.772 jpg webp

बोदवड तालुक्यात पेरणीपासूनच पावसाची कमतरता झाल्याने खरीपातील उडीद, मुग, सोयाबीन ही अल्प कालावधीची पिके वाया गेली. काहींनी उपलब्ध सिंचनाद्वारे पिके जगविली मात्र, अशातच, गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत कापुस, मका, ज्वारी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाची बोन्डे सडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अद्यापही शेतकऱ्याच्या शेतमालाचे पंचनामे झालेले नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी बांधवांना सरसकट भरपाई मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now