जळगाव | जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १५ अंशांदरम्यान स्थिर आहे. किमान तापमान खाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. कमाल तापमान ३६ अंशांवर असल्याने दुपारी उन्हाची तीव्रता वाढली आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे तापमानात चढ-उतार हाेत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान वाढत असून, किमान तापमानात तब्बल पाच ते आठ अंश चढ-उतार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ हाेत असून उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारनंतर रविवारीदेखील किमान तापमानात माेठे चढ-उतार झाले. जिल्ह्यातील यापूर्वी रविवारी कमाल तापमान ३६ अंशांवर हाेते. तर काल तापमान स्थिर होते. पुढील आठवड्यात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता तर पारा ३६ अंशांवर आहे.
हे देखील वाचा :
- गॅस गळतीमुळे सहा घरे जळून खाक ; एकाच दिवसात जिल्ह्यात आगीची दुसरी घटना
- 10वी, 12वी परीक्षेच्या निकालाबद्दल मोठी अपडेट ; कधी लागणार निकाल?
- मलकापुरातील राम नवमी महोत्सवास डॉ.केतकी पाटीलांनी उपस्थिती लावून घेतले दर्शन
- जळगावकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद
- डाळीनंतर आता तांदूळही महागला ; काय आहे प्रति किलोचा दर..