जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । वीर सावरकर वाचून व समजून घेण्याची आपली कुवत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात सावरकरांच्या विचारांची आज देशाला खरी गरज आहे. ज्या जागी कचरा पडला होता, त्या जागी आज बोलका चौक दिसत आहे. सावरकरांच्या विचारांचा जाज्वल्य चौक आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलका करून दाखवला आहे. चाळीसगाव हे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने त्यांच्या विचारांचा पगडा या शहराला लाभल्याचे प्रतिपादन उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.
येथील वीर सावरकर चौक व शहर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय परिसराच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. शनिवारी सायंकाळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते वीर सावरकर चौक व शहर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय परिसराच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, वक्ते प्रकाश पाठक, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वसंतराव चंद्रात्रे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा देवयानी ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील यांनी आभार मानलेत. प्रश्न साेडवण्यातच समाधान… याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, शहरातील दुर्लक्षित असलेल्या वीर सावरकर चौकाचे लोकार्पण होत असताना आनंद आहे. शहरात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असून जो शब्द शहरवासीयांना दिला, तो पाळणारच यात शंका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महापुरात अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना सरकारने अद्यापही दमडीची मदत केली नाही. मात्र, ज्यांची घरे वाहून गेली त्यांना एका महिन्यात ५० घरे तातडीने बांधून दिली. मी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांची तालुक्यासाठी कुणाकडेही शिफारस करत नाही, जो अधिकारी आला, तो आपला समजून विश्वासात घेऊन काम करतो. शहराचा विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवणे यात समाधान मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेशन फस्ट हेच वीर सावरकरांचे ब्रीद
नेशन फस्ट हेच वीर सावरकरांचे ब्रीद … प्रकाश पाठक यांनी वीर सावरकरांच्या विचारांना उजाळा दिला. ते म्हणाले, सावरकर म्हणजे तपस्या, त्याग, तिखापण, नेशन फस्ट- नेशन लास्ट हे सावरकरांचे ब्रीद होते. सावरकरांच्या मनात देशाशिवाय कुठल्याही गोष्टीने स्पर्श केला नाही. सिंहाच्या गर्जनेची ताकद असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे वीर सावरकर हाेय. त्यांचे कामकाज मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.