जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । गेल्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली हाेती. ही लाट हळूहळू ओसरत असून, तापमान वाढत आहे. साेमवारी कमाल तापमान ३१.८ अंशांवर गेले हाेते. तापमान वाढल्याने दिवसभर उन्हाचा चटका वाढला हाेता. या आठवड्यात तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
सध्या सकाळी थंडीचा कडाका जाणवतो तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. रात्रीचे तापमान हळूहळू १५ अंशांकडे झेपावत आहे. साेमवारी किमान तापमान ९.७ अंशांवर हाेते. त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत हवामान काेरडे आणि निरभ्र राहील, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तरेतील राज्यावर हाेत असून, सध्या तरी महाराष्ट्राच्या दिशेने येणारे गार वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली असून, वेगही कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून थंडीची लाट ओसरली आहे.
हे देखील वाचा :
- Breaking : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश
- जळगावात “वोट कर-जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन
- डॉ. केतकीताई पाटीलांनी वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन