⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कावळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार‎ उलटली, महिला ठार तर चौघे गंभीर‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । ‎रस्त्यावर ‎बसलेल्या ‎कावळ्याला ‎वाचवण्याच्या ‎प्रयत्नात ताबा सुटून कार उलटली.‎ त्यामुळे झालेल्या अपघातात‎ कारमधील ४७ वर्षीय महिलेला जबर‎ मार लागल्याने त्यांचा जागीच‎ मृत्यू झाला. तर चार जण‎ गंभीर जखमी झाले. ही घटना चाळीसगाव-नागद‎ रस्त्यावर हातले गावाजवळ‎ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या‎ सुमारास घडली.‎

सविस्तर घटना अशी की, शहरातील हनुमान वाडी‎ भागातील रहिवासी तथा मेडिकल व्यावसायिक व ‎ ‎जळगाव जिल्हा मेडिकल ‎ ‎ असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप ‎ताराचंद‎ ‎बेदमुथा‎ हे नागद येथील भावाला‎ भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा‎ व मुलगी यांच्यासह त्यांच्या‎ स्कोडा कार (क्र. एमएच ०४‎ एफ एफ ९५२३) या गाडीने‎ नागदकडे जात हाेते. सकाळी ९‎ वाजेच्या सुमारास हातले‎ गावाजवळील वीट भट्टीजवळ‎ समोर रस्त्यावर कावळा‎ बसलेला असल्याने संदीप‎ बेदमुथा हे त्यास वाचवण्यास‎ गेले, मात्र त्यात त्यांचा‎ कारवरील ताबा सुटून कार‎ उलटली. त्यात कांचन बेदमुथा‎ (वय ४७) यांच्यासह संदीप‎ बेदमुथा (वय ५०), सायराबाई‎ बेदमुथा (वय ७५), जागृती‎ बेदमुथा (वय २६) व देवेश‎ बेदमुथा (वय २०) हे गंभीर‎ जखमी झाले. कांचन यांना‎ अपघातात जबर मार लागल्याने‎ त्यांचा मृत्यू ओढवला.‎ कन्नडच्या आमदारांनी दिली‎ अपघाताची माहिती‎ या झालेल्या अपघाताची‎ माहिती कन्नडचे आमदार‎ उदयसिंग राजपूत यांनी संदीप‎ बेदमुथा यांचे चुलत भाऊ दीपक‎ जैन यांना कळवली. दीपक जैन‎ यांनी घटनास्थळी धाव घेत‎ नागरिकांच्या मदतीने जखमींना‎ खाजगी वाहनातून शहरातील‎ खाजगी रुग्णालयात दाखल‎ केले. डॉक्टरांनी कांचन बेदमुथा‎ यांना तपासून मृत घोषित केले.‎ तर संदीप बेदमुथा, सायराबाई‎ बेदमुथा, जागृती बेदमुथा व‎ देवेश बेदमुथा यांना जबर मार‎ लागल्याने खासगी रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले.‎ याप्रकरणी दीपक जैन यांनी‎ दिलेल्या माहितीवरून‎ चाळीसगाव ग्रामीण पोलिस‎ ठाण्यात अपघाताचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला.