जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । शिवसेनेने आमच्याशी गद्दारी केली त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत, आमदार,खासदार गेले,मैदानासाठी भांडण करताहेत. उद्या ते शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या करतील,” असा टोला भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.महाजन जामनेर येथे सभेत ते बोलत होते.

यावेळी गिरीश महाजन म्हणाले कि, “शिवसेनेने आमच्याशी गद्दारी करून काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले, त्याची फळे ते आता भोगत आहेत. आज त्यांचे 55 पैकी 40 आमदार गेले, 15 पैकी 12 खासदार गेले, आता त्यांच्याकडे काय राहिले काहीही राहिले नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक बाहेर पडलेत. “आता कार्यालय, मैदानासाठी ते भांडण करीत आहेत,उद्या ते शिवसेना भवना साठी हाणामारी करतील. त्यांनी जो आमच्याशी दगाफटका केला त्याची फळे ते लगेच भोगत आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुकीत ते दिसणारही नाहीत,”