⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तुमचा डीलरही कमी रेशन देतो? एका दिवसात येईल असा लाईनवर, त्वरित ‘या’ नंबरवर करा तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२३ । गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना राबवल्या जातात. मोदी सरकार आणि विविध राज्य सरकारेही गरिबांना रेशनकार्डच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवत आहेत. अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत 1 जानेवारी 2024 पर्यंत मोफत रेशन देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जवळपास सर्वच राज्यांमध्ये शिधापत्रिकाधारकांना अनुदानाच्या दराने रेशन मिळत आहे.

परंतु अनेकदा डीलर रेशन कार्डधारकांना धान्य देताना कमी धान्य देतात किंवा त्यात काही फसवणूकही करतात. अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तुमच्याही ही बाब लक्षात आली असल्यास तुम्ही याबाबत तक्रार करू शकतात. सरकारकडून प्रत्येक राज्यानुसार, हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. जर तुम्हालाही रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल, तर डीलर विरोधात तक्रार दाखल करू शकता.

मोफत अन्नधान्य मिळण्याची सुविधा
प्रत्येक राज्य सरकारकडून राज्यातील रहिवाशांना रेशन कार्ड जारी केले जाते. केवळ शिधापत्रिकेद्वारेच लोकांना कमी किमतीत किंवा मोफत अन्नधान्य मिळू शकते. परंतु अनेकदा डीलर रेशन देण्यास टाळाटाळ करतात किंवा कमी रेशन देतात, असेही अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे गरिबांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण तुम्हाला अशी कोणतीही अडचण येत असेल, तर त्यासाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

डीलरचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो
या हेल्प लाईन्स पूर्णपणे टोल फ्री आहेत. रेशनशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही या क्रमांकांवर कॉल करू शकता. ही तक्रार शिधापत्रिकाधारकानेच करावी. तक्रार आल्यावर चौकशी केली जाईल. तुमचा आरोप खरा ठरला तर डीलरचा परवानाही निलंबित केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्यानुसार सरकारने वेगवेगळे टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. तुम्ही तुमच्या राज्यानुसार कॉल करून तक्रार नोंदवू शकता. महाराष्ट्र राज्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800224950 हा आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.