महत्वाची बातमी : ऑक्टोबरपर्यंत अमृतचे काम पूर्ण न केल्यास मनपाचा ५० कोटींचा निधी परत जाणार

सप्टेंबर 6, 2022 8:12 PM

jalgaon manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । शहरात अमृत योजना अंतर्गत भूमिगत गटारी योजना व पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. त्यामुळे अमृत योजनेचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पुर्ण करा अन्यथा; निधी परत पाठवा असा इशारा नगरविकास विभागाचे सचिव यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे.

जळगाव शहरासाठी शासनाकडून अमृत योजनेअंतर्गंत पाणी पुरवठा व मलनिस्सारन योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. ही योजना पुर्ण होईपर्यंत शहरातील रस्त्यांची कामे करु नये असे शासनाचे आदेश होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना ब्रेक नगरविकास लागला असून संपूर्ण रस्त्यांची सचिवांचा इशारा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तातडीने अमृतचे काम रोषाला सामोरे जावे लागत उभे राहिले आहे.

पुर्ण करुन तातडीने रस्त्यांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यासाठी पदाधिकारी, नगरसेवकांकडून देखील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र, काही केल्या अमृतच्या विभाग आहे. त्यातच आता शासनाच्या नगरविकास विभागाचे सचिव व उपसचिव यांनी शहरातील अमृत योजनेचा आढावा घेतला असता शहरातील अमृत योजनेचे बरेच काम अपूर्ण असून ५० कोटी रुपये अखर्चीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ऑक्टोबर अखेर हे काम पुर्ण करा अन्यथा निधी परत पाठविण्याचा इशारा यावेळी उपसचिवांनी दिला आहे. कामाला गती मिळत नसल्याने म्हणून आता दोन महिन्यात अधिकाऱ्यांना मोठ्याप्रमाणात काम पुर्ण करण्याचे आव्हान नागरिक व नगरसेवकांच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now