जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने-चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला. मागच्या २४ तासात जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची घसरण झाली. यानंतर चांदीचा एक किलोचा दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोवर आला आहे.

सोबतच तर सोन्याच्या दरात १०० रुपयांची घट होऊन सोने १ लाख ५२ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

दि. ३ ऑगस्टपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. १२ ऑगस्टपर्यंत चांदीचा भाव वाढत जाऊन २ लाख ४० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर बाजारात काहीशी नरमाई पाहायला मिळाली.
शुक्रवारी चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरातही १०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बाजारातील दरांकडे लक्ष लागले आहे.












