⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नवरीला घेऊन‎ जाण्यासाठी पाहुणे घरी आले, पण हळदीच्या दिवशीच तरुणीने उचललं टोकाचं पाऊल..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द‎ येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. हळदीच्या दिवशीच तरुणीने‎ विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गायत्री‎ विजय पवार असे मृत तरुणीचे नाव‎ असून यामुळे गावात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, गायत्री हिने आत्महत्या सारखे पाऊल का उचललं हे अद्यापही कळू शकले नाही.

नेमकी काय आहे घटना?
गायत्री पवार हीच्या वडिलांचेही यापूर्वी‎ निधन झाले आहे. ती गावात आई,‎भाऊ, काकांसोबत राहत होती.‎गायत्रीचे करमाड (ता. पारोळा)‎ येथील तरुणाशी लग्न ठरले होते. २८ ‎रोजी लग्न असल्यामुळे २७ रोजी‎ करमाड येथे हळद लागणार होती.‎ त्यासाठी २७ रोजी सकाळी नवरीला‎ घेण्यासाठी करमाड येथून सकाळी‎ १० वाजता गाडी आली होती.‎ लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती.‎

सर्व नातेवाइकांना पत्रिका वाटण्यात‎ आल्या. लग्नामुळे घरात आनंदाचे‎ वातावरण होते. नवरी मुलीस घेऊन‎ जाण्यासाठी गाडीसोबत पाहुणे‎ आले. त्यांचे जेवण झाल्यानंतर‎ सर्वजण नवरीच्या निघण्याची तयारी‎ करत होते. त्याचवेळी गायत्री‎ मोबाइलवर बोलत घराबाहेर पडली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तिला जवखेडा रोडकडे जाताना‎ अनेकांनी पाहिले. नंतर तिच्या मागे‎ कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता,‎ वासुदेव कासार यांच्या विहिरीजवळ‎ तिचा मोबाइल आढळला. तर‎ विहिरीत तरुणी तरंगताना दिसली.‎ नातेवाइकांनी तिला विहिरीबाहेर‎ काढून एरंडाेल येथील ग्रामीण‎ रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला‎ मृत घोषित केले.‎

दरम्यान, गायत्रीचा काही दिवसांपूर्वीच टोळी‎ येथे साखरपुडा झाला होता. तिला‎ शेवटचा फोन कोणी केला, याचा‎ शोध घेतला जात आहे. घटनेमागील‎ कारण स्पष्ट झालेले नाही.