⁠ 
सोमवार, मे 20, 2024

गिरीश महाजन यांनी जळगाव शहराची वाट लावली; गुलाबराव पाटलांची टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२१ । गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते तरीही ते जळगाव जिल्ह्यासाठी निधी आणू शकले नाही. गिरीश महाजन यांनी जळगाव शहराची वाट लावली, अशी टीका पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

संकटमोचक म्हणून मिरवून घेण्यात गिरीश महाजन व्यस्त होते. आपला जिल्हा सोडून ते बाहेरच फिरत राहिले. हा आपल्या पक्षाचा, हा दुसऱ्या पक्षाचा असाच भेदभाव करण्यात त्यांनी वेळ घालवल्याचा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला.

जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात पालकमंत्री असतांना भाजपचे चंद्रकांत पाटील तसेच गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती निधी दिला याची आकडेवारी दाखवावी, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.