जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । रावेर विधानसभा मतदरसंघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या खिरोदा शेती शिवारातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी बागायती धोक्यात आली होती. या ट्रान्सफॉर्मरवरून वीज पुरवठा असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आमदार चौधरी यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. मात्र चौधरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. खडसे यांनी तत्काळ वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विनंती केली.

त्यामुळे २० दिवसांपासून पाण्याविना कोमेजून जाणाऱ्या केळी बागा वाचल्या आहेत. खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकऱ्यांची ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ केली हाेती. त्यानंतर चोरांनी खांबावरील वीज वाहिन्यांची चोरी केली. याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देवून लवकर ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विनंती केली. मात्र २० दिवस होऊनही ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी माजी मंत्री खडसे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. खडसे यांनी वीज महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, त्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. वीज अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत अगदी दोन दिवसांत साहित्याची पूर्तता करून ट्रान्सफॉर्मरची तारांसह वीज जोडणी करून दिली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन खडसे यांचे ऋण व्यक्त केले.
चर्चा
या वेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश चौधरी, रोझोदा येथील शेतकरी लीलाधर झांबरे, लखीचंद नेहेते, रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांच्या गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ. विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या माध्यमातुन सोडवला आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरु होती.
- जळगाव जिल्हा हादरला! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खुन केल्याचे लिहिले !
- लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा
- जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- जळगावात सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार; जिल्ह्यात उभारला जाणार ३९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प
- Jalgaon : आई -वडील बाहेर गावी जाताच युवकाने उचललं नको ते पाऊल ; कुटुंबियांना मोठा धक्का..