⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे चेअरमन, व्हाईस चेअरमन बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । विरावली येथे दिनांक १२ रोजी दुपारी ३ वाजेला चेअरमन, व्हा.चेअरमन पदा करिता निवडणूक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा वतीने चेअरमन पदासाठी अर्जुन माणिक पाटील तर व्हा.चेअरमन पदासाठी नरेंद्र दयाराम पुढे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.जे.तडवी यांनी काम पाहिले. विरावली विकासोच्या निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत परिवर्तन पॅनलला १२ पैकी १० तर शिवसेना पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलला २ जागा मिळाल्या. चेअरमन निवडीनंतर संस्थेच्या परिसरात परिवर्तन पॅनलच्या वतीने यावल रावेर विधानसभाचे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, पंचायत समितीचे गटनेते तथा पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपडा विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल नाना साठे, उंटावद विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन शशिकांत पाटील, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा वाढोदे गावातील सरपंच संदीप भैया सोनवणे, नावरे गावातील माजी सरपंच समाधान पाटील, आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या सर्वांनी चेअरमन अर्जुन माणिक पाटील व्हाईस चेअरमन नरेंद्र दयाराम कोळी, संचालक बाजीराव पाटील, युवराज पाटील, रमेश पाटील, गुलाबराव पाटील, प्रल्हाद पाटील, लीलाधर सोनवणे, उषा महाजन, कोकीळाबाई पाटील ,प्रमिलाबाई पाटील ,आदी सर्व संचालक मंडळाने सत्कार केला. कार्यक्रमासाठी रमेश पाटील, बापू पाटील, सुनिल कोळी, पुनमचंद पाटील,प्रकाश महाजन , दिनकर पाटील, बाळू निंबाळकर, धिरज महाजन, हिरामण पाटील, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य ॲड.देवकांत पाटील, माजी सरपंच समाधान पाटील, संजय पाटील, माजी संचालक शरद राजपूत, सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, गिरीश पाटील, माजी ग्रा.प.सदस्य रणधीर पाटील, माजी ग्रा.प.सदस्य दगडू तडवी, प्रदीप पाटील, गणेश पाटील, धीरज महाजन, आदींनी केले होते . याच कार्यक्रमात गावातील जेष्ठ नागरिक अजबराव पाटील, प्रगतशील शेतकरी तथा विरावली पीक संस्थेचे संचालक गोरख पाटील, हिरालाल पाटील, समाधान पाटील, विजयसिंग पाटील, यशवंत काटे, सुरेश पाटील, आत्माराम धनगर, दिनेश पाटील, नाशिर तडवी, मकबूल तडवी, माधव धनगर, सुभाष पाटील, तेजपाल पाटील, सुदाम पाटील, अशोक तायडे, संजू पूना पाटील, संग्राम पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरवाडे आप्पा, सिकंदर तडवी व कृष्णा पाटील, राज पाटील, गौरव पाटील आदींनी परिश्रम घेतले.