⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सणासुदीपूर्वी जनतेला झटका : EMI महागणार, RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । सणासुदीपूर्वी जनतेला झटका बसला असून सणासुदीच्या काळात ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने  रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. आता रेपो दर 5.40% वरून 5.90% झाला आहे, तर SDF चा दर 5.15% वरून 5.65% झाला आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. त्यावेळी ही घोषणा केली.

आरबीआयने रेपो दरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. यामुळे तुमचा ईएमआयही महाग होईल. आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मे महिन्यापासून रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढला आहे
यापूर्वी, एमपीसीच्या शिफारशींच्या आधारे, आरबीआयने जून आणि ऑगस्टमध्ये दोनदा रेपो दरात 0.50-0.50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. याआधी मे महिन्यात मध्यवर्ती बँकेने अचानक व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानुसार मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आगामी काळात कर्जे अधिक महाग होतील
रेपो दरात वाढ केल्यास कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. बँकांना पैसा महाग वाटला तर आगामी काळात कर्जे आणखी महाग होतील. याचा परिणाम बँका ग्राहकांवर करतील. त्यामुळे घरांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

रेपो रेट म्हणजे काय?
विशेष म्हणजे, रेपो रेट हा दर आहे ज्या दराने आरबीआय बँकेला कर्ज देते आणि त्या आधारावर बँका ग्राहकांना कर्ज देतात, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय त्यांना बँकांकडून ठेवींवर कर्ज देते. अशा परिस्थितीत जेव्हा आरबीआय रेपो दर वाढवते तेव्हा बँकांवर बोजा वाढतो आणि बँकेच्या वतीने बँक दरात कर्ज महाग होते.