खुशखबर.. लवकरच पिठासह गहू स्वस्त होणार! सरकारने केली खास योजना

सप्टेंबर 21, 2022 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसात महागाई भरमसाठ वाढली आहे. देशात खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुशकील झाले आहे. सध्या गव्हाच्या दरात सातत्याने (Wheat) वाढ होत आहे. वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने मे महिन्यात त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. सध्या गव्हाच्या दरात वाढ असून, त्यामुळे पिठाचे भावही वाढले आहेत. आता किमतींवर लगाम घालण्यासाठी सरकार लवकरच मोठी कारवाई करू शकते.

wheat jpg webp

अन्न सचिवांनी माहिती दिली
गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करू शकते. माहिती देताना अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, जर भारतात गव्हाचा पुरेसा साठा असेल तर सर्वसामान्यांना काळजी करण्याची गरज नाही. सचिव म्हणाले की, गव्हाच्या किरकोळ किमतीत वाढ सट्टा व्यवसायामुळे झाली आहे.

गव्हाचे भाव १९ टक्क्यांनी वाढले आहेत
त्यामुळे केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांना इशारा दिला असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत गव्हाच्या किरकोळ किमतीत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पीठ किती महाग झाले?
गेल्या वर्षी गव्हाचे दर २६.०१ रुपये किलो होते, ते आज ३१.०२ रुपये किलो झाले आहेत. याशिवाय पिठाच्या किमतींवर नजर टाकली तर गेल्या वर्षी पिठाचा भाव ३०.५३ रुपये किलो होता. त्याच वेळी, आज पिठाचा भाव 36.1 रुपये प्रति किलो आहे. या दरम्यान पिठाच्या किमतीत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्पादन किती चालू आहे?
जर आपण गव्हाच्या उत्पादनाबद्दल बोललो, तर ते 2021-22 पीक वर्षाच्या (जुलै-जून) रब्बी हंगामात सुमारे 105 दशलक्ष (105 दशलक्ष टन) टन होते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या अंदाजाबाबत बोलायचे झाले तर गव्हाचे उत्पादन ९५ दशलक्ष टन होईल. सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now