जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । गेल्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली हाेती. ही लाट हळूहळू ओसरत असून, तापमान वाढत आहे. साेमवारी कमाल तापमान ३१.८ अंशांवर गेले हाेते. तापमान वाढल्याने दिवसभर उन्हाचा चटका वाढला हाेता. या आठवड्यात तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
सध्या सकाळी थंडीचा कडाका जाणवतो तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. रात्रीचे तापमान हळूहळू १५ अंशांकडे झेपावत आहे. साेमवारी किमान तापमान ९.७ अंशांवर हाेते. त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत हवामान काेरडे आणि निरभ्र राहील, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तरेतील राज्यावर हाेत असून, सध्या तरी महाराष्ट्राच्या दिशेने येणारे गार वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली असून, वेगही कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून थंडीची लाट ओसरली आहे.
हे देखील वाचा :
- उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीवर पुतणे रोहित निकमांची प्रतिक्रिया ; म्हणाले मी लोकसभा..
- खुशखबर! तीन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या धावणार ; भुसावळ, जळगाव येथे असेल थांबा
- जळगाव आणखी तापणार! उद्यापासून तापमान वाढीचे संकेत, ‘या’ तारखेपासून पावसाची शक्यता
- महिला डॉक्टरसोबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल
- शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यात तीन सभा होणार ; कुठे आणि कधी??