जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । लग्नात हुंडा दिला नाही म्हणून ३६ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री तुषार सोनवणे (वय-३६) रा. संत मिराबाई नगर जळगाव यांचा विवाह ३० एप्रिल २०१८ रोजी जळगावातील डीएमसी कॉलनीत राहणारे तुषार अशोक सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस सुरुवातीला चांगले गेल्यानंतर पती तुषार सोनवणे यांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून त्यांना टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर सासू उपणि दीर यांनी माहेरहून पैसे घेऊन यावे, यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेने मंगळवारी २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन छळ झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार अशोक सोनवणे, सासू प्रमिलाबाई अशोक सोनवणे आणि दीर अमोल अशोक सोनवणे सर्व रा. डीएमसी कॉलनी ओम नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत
- चोपड्यात अमली पदार्थांवर पोलिसांचा दणका; ७ किलो गांजासह तीन तस्करांना अटक!
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू









