जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकाराचा संशय आहे. या प्रकरणी शासकीय व अशासकीय संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की स्वतःच्या नावावर एक गुंठा ही शेतजमीन नसलेले पाच सहा हजार जणांना शेतकरी दाखवून तालुक्यात त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रकरणी किती अचूक बोगस शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते कोणाच्या लॉगीन वरून करण्यात आले आहे. ज्या लॉगिन वरून हे करण्यात आले आहे. तसेच या बोगस प्रकरणांना मंजुरी देणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केली असल्यास काय व कोणावर कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती मिळावी तसेच या प्रकरणी रक्कम वर्ग झाली आहे. ती परत मिळविण्यासाठी काही कार्यवाही करण्यात आली आहे. का? याची देखील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा :
- धुळे-पारोळा महामार्गावर भीषण अपघात! केमिकल टँकर कंटेनरवर धडकल्याने लागली आग; दोघांचा होरपळून मृत्यू
- दुर्दैवी! पारोळ्यात शेतकाम करताना उष्माघाताने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
- पारोळ्यात घरामध्ये लपवून ठेवलेला लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त!
- पारोळ्यात नात्याला काळिमा! १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग प्रकरणी नराधम काका गजाआड
- पारोळ्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठवणुकीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक










