जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकाराचा संशय आहे. या प्रकरणी शासकीय व अशासकीय संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की स्वतःच्या नावावर एक गुंठा ही शेतजमीन नसलेले पाच सहा हजार जणांना शेतकरी दाखवून तालुक्यात त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रकरणी किती अचूक बोगस शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते कोणाच्या लॉगीन वरून करण्यात आले आहे. ज्या लॉगिन वरून हे करण्यात आले आहे. तसेच या बोगस प्रकरणांना मंजुरी देणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केली असल्यास काय व कोणावर कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती मिळावी तसेच या प्रकरणी रक्कम वर्ग झाली आहे. ती परत मिळविण्यासाठी काही कार्यवाही करण्यात आली आहे. का? याची देखील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा :
- Parola : दागिन्यांच्या लालसेतून मावशीचा खून; ४० दिवसांनंतर हत्येचा उलगडा, भाच्याला अटक
- Parola : जुन्या भांडणातून चाकू भोसकून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक
- ईको कारच्या मौल्यवान धातूंची चोरी! नाकाबंदीदरम्यान आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
- कोंबडी खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा माल; पारोळ्यात काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
- ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण; जीव वाचवण्यासाठी पळताना दुर्दैवी मृत्यू, सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल






