⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | बातम्या | गरिबांना पुढील ४ वर्षे मोफत धान्य मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

गरिबांना पुढील ४ वर्षे मोफत धान्य मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । केंद्रातील मोदी सरकारने देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी भेट दिली आहे. आता गरिबांना पुढील ४ वर्षे मोफत धान्य मिळत राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मोफत धान्य योजनेला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की पुढील चार वर्षे म्हणजे 2028 पर्यंत सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गरिबांना दरमहा पाच किलो मोफत रेशन दिले जाते.

मंत्रिमंडळाने PMGKAY योजनेला 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या गरीबांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकारच्या घोषणेचा देशातील 80 कोटी लोकांना होणार फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण अन्न योजना (PM-GKAY) आणि इतर कल्याणकारी योजना जसे की माध्यान्ह भोजन, मोफत रेशन योजना, PM पोशन योजना यासारख्या सर्व योजनांतर्गत मजबूत तांदळाचा पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर, 2028 या कालावधीत सुरू ठेवला. ठेवण्यास मान्यता दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.