⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आता तुमचा खिसा आणखी होणार खाली? आजपासून बदलले ‘हे’ 5 मोठे नियम..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । दर महिन्याच्या 1 तारखेपासून काहीना काही बदल होत असतात. जे तुमच्या खर्चाशी संबंधित असतात. दरम्यान, आता आज सोमवारपासून मे महिन्याला सुरुवात झाली असून आज 1 मे पासून 5 मोठे बदल झाले आहे. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे. ते नेमके कोणते आहेत ते जाणून घ्या..

म्युच्युअल फंड kyc

बाजार नियामक संस्था SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच ई-वॉलेटचा वापर केला आहे याची खात्री करण्यास सांगितले आहे, ज्यांचे KYC पूर्ण आहे. हा नियम १ मेपासून लागू होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात. केवायसीसाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मोबाइल नंबर आणि बँक तपशील द्यावा लागेल. या सर्व तपशीलांसह, केवायसीसाठी एक फॉर्म भरावा लागेल.

जीएसटी नियमांमध्ये बदल

१ मे पासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, आता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती 50 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी लागेल. ते बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.

एलपीजीच्या दरात बदल

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. 1 एप्रिल रोजी सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती एका वर्षात 225 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 1 मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल दिसू शकतात.

PNB ग्राहकांसाठी मोठा बदल

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवे नियम १ मे पासून लागू होणार आहेत. एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून 10 रुपयांसह जीएसटी घेतला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिली आहे.

मुंबई मेट्रोच्या भाड्यात 25 टक्के सूट
1 मे पासून, मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास शुल्कात 25 टक्के सवलत जाहीर केली आहे. या लाईन्स महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDAA) द्वारे चालवल्या जातात. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं दाखवावी लागतील.