⁠ 
बुधवार, मे 8, 2024

मनपातील सत्ताधाऱ्यांनी जळगावकरांना वाऱ्यावर सोडले : राजेंद्र घुगे-पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत असून शहर मनपातील सत्ताधाऱ्यांनी जळगावकरांना वाऱ्यावर सोडले आहे. 

दोन दिवसापूर्वी झालेल्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या सभेत आरोग्यासाठी केलेली १५ कोटींची तरतूद कमी करून नगण्य स्वरूपात करायला लावली. मनपावर कर्ज जसेच्या तसे आहे असे सत्ताधारी म्हणतात. मला वाटते एकतर सत्ताधाऱ्यांना त्यातील कळत नाही किंवा ते न कळण्याचे ढोंग करीत आहे असा टोला स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 यावेळी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक साखरे उपस्थित होते.

पहा व्हिडीओ :