जो पर्यंत असोदा रेल्वे पूल पूर्ण होत नाही तो पर्यन्त…

ऑगस्ट 21, 2022 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जाेपर्यंत उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू हाेत नाही ताेपर्यंत रस्त्याची देखभाल ठेवावी या अटींवर मनपाने रेल्वेगेट बंद करण्यासाठी ना-हरकत दिली आहे. अश्यावेळी भविष्यात रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने वाहनधारकांसाठी पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करावे.असे मनपाने सांगितले आहे.

आसाेदा रेल्वेगेटवर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. आसाेदासह ८ गावांना तसेच यावल तालुक्याला जाेडणाऱ्या आसाेदा रेल्वेगेट येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या कामाला वेग आल्याने त्या ठिकाणची वाहतूक बंद करावी लागणार आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासनात पत्रव्यवहार सुरू आहे.

अधिक माहिती अशी कि,आसाेदा रेल्वेगेट बंद करण्यासाठी ना-हरकत कळवली आहे. तत्पूर्वी महापालिकेने काही अटी व शर्तींचा अंतर्भाव केला आहे. यात रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी रेल्वेगेटकडून ममुराबाद पुलाकडे अर्थात प्रजापतनगराकडे जाण्यासाठी रस्त्यांचे डांबरीकरण करून द्यावे. अशी सूचना केली. दाेन दिवसांपूर्वीच महापालिकेने रेल्वे प्रशासनाला केली आहे.

jalgaon manapa

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now