---Advertisement---
गुन्हे अमळनेर

अमळनेरमध्ये भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू ; दोन महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात रोज कुठेना कुठे अपघात घडत असून यात अनेकांना जीव देखील गमवावा लागतोय. अशीच अपघाताची एक घटना आता अमळनेर तालुक्यात घडली. ज्यात रिक्षाला भीषण अपघात झाला. रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला, आणि तरुणाचा मृत्यू झाला. भटू पाटील (भटू बाबा) असं मृत तरुणाचं नाव आहे.

aml 1

ही घटना अमळनेर तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसीजवळ आज सकाळी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा जागीच चक्काचूर झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे भटू पाटील याचा तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस होता. त्याच्या मित्रपरिवाराने त्याचा वाढदिवस खूप जल्लोषात साजरा केला होता.

---Advertisement---

दुसरी गोष्ट म्हणजे भटूने अडीच महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं. आई-बापाला आपल्या लेकाची आणि बायकोला आपल्या नवऱ्याची बातमी कळल्यानंतर त्यांनी एकच टाहो फोडला. तरुण तडफदार लेक गेल्यानं सर्वत्र नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भटू बाबा हा स्वभावाने खूप चांगला आणि मनमिळावू होता. तो सर्व मित्रांना हवाहवासा वाटायचा पण काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्याला हिरावून घेतलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment