---Advertisement---
हवामान

अवकाळीमुळे नासधूस! मार्च, एप्रिलनंतर आता मे महिना कसा जाणार? काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । यंदा सततच्या बदलत्या हवामानाने सगळ्यांना चकित केलं आहे. यंदाच्या फेब्रुवारीच्या पंधरवडामध्येच उष्णतेचा कहर पाहायला मिळाला होता. त्यांनंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होते. गेल्या महिन्याच्या म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात देखील राज्यात गारपिटीसह वादळी पावसाने थैमान घातलं होते. एकंदरीत दोन महिन्याच्या बदलत्या वातावरणानंतर आता मे महिना कसा जाणार? असा प्रश्न अनेकांना पडतोय. आता मे महिना कसा असणार याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

tapman 3

मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही?
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील उन्हाचा चांगलाच फटका बसला. परंतु एप्रिल संपत असताना तापमान ४० च्या आत स्थिर राहिले. आता मे महिना उजाडला तरी यंदा तापमान वाढले नाही. त्यामुळे मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

---Advertisement---

नेमका काय हे मे महिन्याचा अंदाज?
राज्यभरात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत आहे. एप्रिल व मे महिना उन्हाळ्याचा असतो. परंतु यंदा मे महिन्यात ऊन कमी असणार आहे. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये वायव्य भारतात, पश्चिम-मध्य भारताच्या अनेक भागांत मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.

जळगावातील तापमानाचा पारा 40 अशांवरच
सध्या अवकाळीचे ढग घोघावत असलयाने तापमान वाढले नाहीय त्यामुळे उकाडा जाणावत नाही. जळगाव शहराचे तापमान 40 अंशांखालीच आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून वळवाच्या पावसाचे वेध लागतात. यामुळे कडक उन्हाळा यंदा जाणवणार नाही, असे म्हटले जाते.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या हालचाली सुरू आहेत. बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान या चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यादरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीवर 150 ते 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.या चक्रीवादळाला मोचा या नावाने ओळखले जाणार आहे. आधीच अवकाळीने देशातील अनेक राज्यांना झोडपून काढलं असता त्यात आता मोचा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---