⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून शिंदेंनी घेतला निर्णय – आ. गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून एकनाथ शिंदेसह शिवसेना आमदारांनी हा नॉट रिचेबल निर्णय घेतला आहे.अशी प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी गिरीश महाजन म्हणले कि, भाजपा शिंदेंना कोणत्याही प्रकारची रसद पुरवत नाहीये. आम्ही महिना झाला इथेच आहोत. आमच्या बैठकी महिनाभरापासून सुरु आहेत. मी महिन्यापासून इथेच आहे. त्यामुळे आमच्या बैठकीचा या सगळ्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. , हा असंतोष झालेला आहे. त्याचाच हा परिणाम आहे असंही वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय.

सोमवारी रात्री विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विधान भवनाच्या परिसरात भाजप नेत्यांनी एकमेकांच्या गळाभेटी घेत जल्लोष साजरा केला. हि निवडणूक भाजपासाठी म्हणण्यापेक्षा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. राज्यसभेत करिष्मा केल्यानंतर फडणवीस विधान परिषदेतही चमत्कार करतील का? याकडे राज्याचेच नव्हे तर दिल्लीचेही लक्ष लागून होते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाचे पाचवे उमेदवार दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या जोरावर निवडून आले. यामुळे फडणवीसांनी मैदान मारले.
हेही वाचा : Eknath Shinde Updates : जळगावातील शिवसेनेचा शेवटचा आमदार देखील फुटला!

भाजपातर्फे जल्लोष साजरा होत असतांना फडणवीसांची अवघ्या १० ते १२ सेकंदांची एक कृती आता चर्चेत आली आहे. भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात होतात फडणवीस यांची भाजपा आमदार गिरिश महाजन यांनी गळाभेट घेतली. यामुळे महाजन प्रचंड आनंदात होते मात्र फडणवीस काहिसे गंभीर भावमुद्रेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी महाजन यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर महाजनांचा चेहरा थोडासा गंभीर मुद्रेत दिसून आला. कुणाला काही कळण्याच्या आत फडणवीस यांनी पुन्हा आनंदी चेहरा करत अन्य आमदारांकडून शुभेच्छा स्विकारल्या.

फडणवीसांनी भाजपाला इतका मोठा विजय मिळवून दिल्यानंतरही त्यांच्या चेहर्‍यावर कसली चिंता होती? याचे कोडं मंगळवारी सकाळी उलगडलं आहे. शिवसेनेते वजनदार नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे ठाकरे सरकार प्रचंड अडचणीत आले आहे. शिंदे हे त्यांच्या १३ समर्थक आमदारांसह सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यांची व्यवस्था भाजपा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी केली असून शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहेत.

दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस सर्व कार्यक्रम सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही वेळापूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या सर्व घटनांची कडी जोडून पाहिल्यास फडणवीस, महाजनांच्या कानात काय बोलले? येथे येवून थांबत आहे.