जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । एरंडोल येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव यांचा पत्रक़ारिता क्षेत्रातील प्रदीर्घ (35 वर्षे) योगदान, उल्लेखनिय कामगिरीबद्दल सुर्योदय पत्रक़ारिता पुरस्कार दि. 8 मे 2022 रोजी मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. अहिरराव आणि सौ. शकुंतला अहिरराव दोघांनी पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाा गणोरकर, समारोपीय अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष दलूभाऊ जैन, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीष जैन, जळगांव शहराध्यक्ष साहेबराव पाटील यांचेसह डॉ. म. सू. पगारे, सुप्रसिध्द लेखक डॉ. विश्वनाथ शिंदे, लेखक अशोक कोतवाल, डॉ. नरसिंह परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कांताई सभागृहातील संमेलनास धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, नंदूरबारसह अनेक जिल्ह्यातील लेखक, कवी यांचा गौरव, पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा :
- आज या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल ; शुक्रवारचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात
- गोदावरी अभियांत्रिकीत ‘मेरा वोट मेरी ताकत’ पॅनल चर्चासत्र संपन्न
- गोदावरी अभियांत्रिकीत ईद मिलन उत्साहात
- राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत फायरमन पदांसाठी मेगाभरती ; पात्रता 10वी पास अन् पगार 63000 पर्यंत