जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदची बातमी आहे. ती म्हणजे राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी आता भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे.

सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याच्या प्रशिक्षण आणि खास पथकेच्या अपर पोलिस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहेआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पोलिस भरतीत मैदानी चाचणी होती. दरम्यान, सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात मैदानी चाचणी घेणे शक्य नाही. पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नसल्याने आता गणेशोत्सवानंतरच ही भरती केली जाणार आहे. गणेशोत्सवात राज्यभर पोलिस अधिकाऱ्यांची ड्यूटी असते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया करणे शक्य नाही. यामुळेच सप्टेंबरअखेर उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात खऱ्या अर्थाने भरतीला सुरवात होईल.
राज्यात तब्बल दहा हजार १८४ पोलिसांची पदे रिक्त आहे.यामध्ये बँडसमन, राज्य राखीव पोलिस बल अशी दीड हजार पदे रिक्त आहेत. यानंतर प्रशिक्षण व खास पथकांसाठी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिली आहे.











