जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्याला शनिवारी रात्री तसेच पहाटेपासून अचानक वादळी वाऱ्याने झोडपून काढले. पहाटे रब्बीच्या पिकांवर संकट कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी मका, ज्वारी, ऊस, दादरचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी दादर ज्वारीसह मका, गहू ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.

तालुक्यातील काही भागात सध्या रब्बी ज्वारी फुलोऱ्यावर आली आहे. तर अचानक आलेल्या वादळाने बहरलेल्या ज्वारी व मक्याला जमीनदोस्त केले. तालुक्यात खरीप हंगामात-ही अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. खरिपात पिकांचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली हाेती. परंतु, अचानक आलेल्या वादळाने रब्बी पिके जमिनदोस्त झाल्याने दोन्ही हंगामात उत्पन्न न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वादळाने मका, गहू आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाले.

तीन मंडळात धुमाकूळ
शहरासह तालुक्यात मांडळ, मारवड, कळमसरे महसुली मंडळात शनिवारी रात्री अचानक वादळी वाऱ्याचा वेग वाढला हाेता. यामुळे तीन मंडळातील गहू, मका, रब्बी ज्वारी, दादर यांना वादळाचा फटका बसला आहे. दरम्यान, दिवसभरात तालुका कृषी विभागाचा एकाही अधिकारी शेतीच्या बांधापर्यंत पाेहाेचला नव्हता.
हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






