जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहराच्या महामार्गावरील अजिंठा चाैफुली अपघाताचे माहेरघर झाली असून, परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे त्यात भर पडली आहे. चाैकातून चारही दिशांना माेठ्या प्रमाणात वाहतूक हाेते. त्यामुळे ३०० मीटर अंतरापर्यंत वाहन पार्किंगला बंदी घालावी, अशी मागणी महापाैर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अजिंठा चौकातून मध्य प्रदेश, औरंगाबाद, धुळे, मुंबईसाठी रस्त्याची विभागणी होते. या परिसरात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची दाट वस्ती आहे. त्यामुळे वाहनांसह नागरिकांची वर्दळ असते. त्यात काही लोक रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करतात. त्यामुळे या चौफुलीवर अपघात होतात. अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. या चौफुलीच्या ३०० मीटर परिसरात चारही बाजूला अवजड वाहने पार्किंगला रस्ते वाहतूक सुरक्षा समितीच्या माध्यमातून तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी महापाैर महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






