जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा सलग मारा सुरू असून अजून दोन चक्रवातांचा अंदाज असल्याने पुढील आठवड्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे. भुसावळ शहरात गेल्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा तापमानात घसरण झाली आहे. यामुळे आता वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.
भुसावळ शहराचे कमाल तापमान बुधवारी (दि.९) ३४.९ अंशावर तर किमान तापमान १७.३ अंशांवर होते. मात्र पुन्हा पश्चिमी विक्षोभामुळे किमान तापमानात ४.६ अंशांनी कमी झाले आहे. तर कमाल तापमान आता ०.९ अंशांवर घटले असून ३३.८ अंशांवर पारा कायम आहे. यामुळे आता वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.
शहरात ७ फेब्रुवारीपासून उकाडा जाणवत होता. शहराचे ५ फेब्रुवारीचे किमान तापमान १०.५ अंशांवर होते. तर मंगळवारी ८ रोजी यात वाढ होऊन पारा १३.१ अंशांवर पोहोचला. मात्र एकाच दिवसांत तब्बल ५.२ अंशानी वाढ होऊन बुधवारी किमान तापमान १७.३ अंशांवर पोहोचले. यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागेल असे वाटत असतानाच शुक्रवारपासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे.
शुक्रवारी शहराचे किमान तापमान १३.५ अंश तर किमान तापमान ३३.८ अंशावर घसरले. तर शनिवारी शहराचे किमान तापमान १२.७ अंशावर घसरले. दरम्यान तापमानातील हा बदल अजून तीन ते चार दिवस कायम राहिल. येत्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात किमान २ ते २.५ अशांनी वाढ होईल, असा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. तोपर्यंत शहरात थंडीचा मुक्काम कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर भारतात १३ व १४ फेब्रुवारी तसेच १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पाऊस, बर्फवृष्टी, धुके पडणार असून थंडीत वाढ होईल. रविवारी राज्यात सरासरी किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होऊन थंडी जाणवेल. द. भारतात तामिळनाडूसह केरळमध्ये ५ दिवस तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात किती उमेदवार वैध-अवैध ठरले ; वाचा ही बातमी
- शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; ही आहेत शेवटची तारीख
- वाढत्या तापमानामुळे केळी बागा धोक्यात ; दरही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात
- ऐनपूरच्या शेतकऱ्याला लावला २३ लाखांचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन