जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । रासायनिक खताच्या किमतीमध्ये गेल्या ५ वर्षात तब्बल दुपटीने भाववाढ झाली आहे. येत्या काळात याचे भाव अजून वाढतील असा अंदाज आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. याच बरोबर शेतकरी बांधवांना , शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. (The prices of chemical fertilizer duble )

कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या पाच वर्षात भाववाढ केली आहे. जवळपास ४० टक्क्यांपर्यंत ही वाढ गेल्या एका वर्षात झाली. गत २ वर्षापासून कोरोनाशी संघर्ष करता करता शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. कंपन्यानी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये एकाच वेळी जवळपास ४० टक्क्यांनी वाढ केल्याने शेतकरी वर्गासमोर नवीन मोठे संकट उभे ठाकले आहे.

गत २ वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गास अनंत अडचणींचा सामना करावा लागला आहे. शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. मात्र, रासायनिक खताच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र आहे.
सरायनिक खतांचे वाढते भाव
| मालाचा प्रकार | २०१४ भाव | २०२२ भाव |
| पोटॅश | ९५० | १७०० |
| १०-२६-२६ | ११५० | १४७० |
| १२-३२-१६ | ११६० | १४८० |
| डी ए पी | ११८७ | १३५० |
| एस एस पी पावडर | ३३० | ५२० |
| एस एस पी ग्रनुअल | ३९० | ५६० |











