जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकण्याच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान विशेष ७२ तासांचा मेगा पाॅवरब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ५ आणि ६ फेब्रुवारी असे दोन दिवस भुसावळ विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू यासाठी पुन्हा पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 5 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, ५ आणि ६ फेब्रुवारी असे दोन दिवस भुसावळ विभागातून धावणारी १२१११ / १२११२ मुंबई-अमरावती व १२१४० / १२१४० नागपूर मुंबई सेवाग्राम या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर मनमाडमार्गे धावणाऱ्या १२०७१ मुंबई-जालना जनशताब्दी, १२०७२ जालना- मुंबई, १२१०९ मुंबई -मनमाड पंचवटी, १२११० मनमाड -मुंबई पंचवटी, १७६११ नांदेड- मुंबई राज्यराणी, १७६१० मुंबई -नांदेड राज्यराणी.. रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
हे देखील वाचा :
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
- ‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा
- जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? वाचा हवामान अंदाज
- जळगाव जिल्ह्यातील 31,908 शेतकरी कर्जमुक्त होणार; 184 कोटींची रक्कम जमा











