जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २० फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थांना येत्या १० जानेवारीपर्यंत शुल्क जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थांनी अद्याप शिष्यवृत्ती अर्जासाठी नोंदणी केली नाही, त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?








