---Advertisement---
भुसावळ

हतनूरचे 12 दरवाजे पूर्ण उघडले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधतेचा इशारा

hatnur dam
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. २२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात १८१८७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

hatnur dam

मध्यप्रदेश आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे आज सकाळी ७ वाजता धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहे. 

---Advertisement---

दरम्यान, धरणातील पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---