जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । तरुणीकडून लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. अजय सिताराम इंगळे (वय-२५, रा.उंचदा, ता. मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
अजय सिताराम इंगळे हा मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणी गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होती. मात्र, या लग्नास अजय याने नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.
हे देखील वाचा :
- Breaking : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश
- जळगावात “वोट कर-जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन
- डॉ. केतकीताई पाटीलांनी वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन