बापरे ! जिल्ह्यातील शिंदेंचे ‘ते’ आमदार रात्रभर झोपलेच नाहीत ?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागला. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे १६ आमदारांमध्ये २ जिल्ह्यतातील आमदारांचा समावेश आहे. मात्र शिंदे गटाने ते तो आमदार रात्रभर झोपलेच नाहीत अश्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

eknath shinde khadesh jpg webp

सर्वोच न्यायालयात नक्की काय निकाल लागतो? आपण अपात्र होणार का ? आणि झालो तर पुढे काय? या चिंतेने या आमदारांना रात्रभर झोपच लागली नाही. असे म्हटलें जात आहे.

पक्षात बंड करून सुरतला गेलेल्या त्या आमदारांना अपात्र ठरवावे अशी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ज्यात जळगावच्या लता सोनवणे आणि चिमणराव पाटील यांचा समावेष आहे. मात्र आज आपली आमदारकी जाते कि काय ? या चिंतेमुळे हे आमदार रात्रभर झोपलेच नाहीत असे म्हट्ले जात आहे.

मुख्यमंत्री अपात्र ठरले तरीही राज्यातील शिंदे गट व भाजपचे सरकार कोसळणार नाही असा दावा राजकीय नेते करत होते. मात्र अपात्र ठरणाऱ्या आमदारांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याची येईल असे चित्र होते. अशा स्थितीत राज्यातील सरकार तरले तरीही या आमदारांच्या पदरी मात्र निराशाच येईल. या चिंतेमुळे जळगावातील ते २ आमदार झोपलेच नाहीत असे चित्र पाहायला मिळत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now